३० डिसेंबर नंतर ३१ डिसेंबर ला कंपनीचे निरिक्षण करून कारवाई करण्याचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडाळा च्या अधिकार्यां कडुन आश्वासन
कोलवॉशरी बंद न केल्यास इच्छा मरण आत्महत्या करण्याची परवानगी द्या- शेतकऱ्यांची मागणी
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महा मिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड कोल वाशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला. या कोल वाॅशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खदान व इतर खदान येथुन येणाऱ्या कोळसा वॉश करताना उडण्याऱ्या धुळी मुळे वराडा आणि परिसरातील ६०० एकर वर शेती प्रदुषित झाली आहे.कोळसा धुळ मिश्रीत पाण्यामुळे जमिनीतील पाणी सुध्दा प्रदुषित झाले आहे. धुळकणा मुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे .
यास्तव वरडा ग्रामपंचायत सरपंच , शेतकरी व जय जवान जय किसान संघटने चे अध्यक्ष प्रशांत पवार , कांग्रेस चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे , नरेश बर्वे , चंद्रपाल चौकसे , राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर व इतर संघटने द्वारे (दि.२३) डिसेंबर ला परिसर प्रदुषण मुक्त करण्यास कंपनी बंद करावी या करीता आंदोलन केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत फोन वर चर्चा करून कंपनीस टाळे लावण्याचे आदेश देण्यात आले होते . परंतु कंपनी सुरू ठेऊन चोरीने कोळसा भरलेले ट्रक काढत असल्याने आंदोलन कर्त्यांनी (दि.२४) ला धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचे ठरविले. या दरम्यान मध्य रात्री १ वाजता उपविभागिय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या उपस्थित कन्हान पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अटक करून नगरपरिषद येथे कोंबुन १७ तास बंदी बनवुन ठेवले व सकाळी सरपंचा सह महिलांना कन्हान पोलीस स्टेशन ला बंदी बनवुन ठेवले. पोलिसांनी आम्हाला येथे बंदी म्हणुन ठेवले का ? व गुन्हे दाखल का करित नाही असे विचारले असता टाळाटाळीचे उत्तर देण्यात आले. यामुळे सोमवार (दि.२६) डिसेंबर ला या बाबत विचारणा करण्यासाठी वराडा व एसंबा येथील शेतकऱ्यांनी जय जवान जय किसान संघटने चे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळा च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलीसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त यावेळी होता. कंपनी बंद करावी या बाबत विभागीय अधिकारी अशोक करे यांना जाब विचारण्यात आला. करे यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी बोलतील असे सांगुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे यांच्याशी चर्चा केली.
येत्या ३० तारखे नंतर ३१ तारखे ला कंपनीचे निरिक्षण करून कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन देण्यात आले. येत्या ३० तारखे नंतर ६०० एकर वर शेती व गावास कंपनी च्या उडणाऱ्या कोळश्या धुळी पासुन मुक्त करण्यास कंपनी बंद करण्याची ठोस भुमिका न घेतल्यास आम्हा शेतकऱ्यांना इच्छा मरण आत्महत्या करण्यास परवानगी देण्यात यावी . अशी शेतकऱ्यांनी मागणी केली .
या आंदोलनात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी पवार , कांग्रेस नेते चंद्रपाल चौकसे , वराडा येथील सरपंचा विद्याताई चिखले , जय जवान जय किसान संघटना सहसचिव प्रकाश डोंगरे , अभिनव फटिंग , निलिकेश कोल्हे , उत्तम सुळके व शेतकरी हिरालाल खिळेकर , दिलीप चिखले , ग्रा पं सदस्य कैलास तेलंगे , राहुल भालेराव , कृष्णा खिळेकर , संदिप पांडे , धमेंद्र किनेकर , शालुबाई खिळेकर , सविता चिखले , उषाबाई खिळेकर , शुभांगी घारड , शारदाबाई तेलंगे सह शेकडो च्या वर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या