Advertisement

अर्हेर-नवरगाव येथे महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी

अर्हेर- नवरगाव येथे महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी

अर्हेर-नवरगाव येथे दि. 9 ऑक्टोबर, रविवारी ला महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंचां दामिनीताई जागेश्वर चौधरी यांनी आद्यकवी महर्षि वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी गावकरी मंडळी उपस्थित होते.

वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदीकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते. कार्यक्रमाच्यावेळी
अध्यक्ष दामिनीताई जागेश्वर चौधरी सरपंच ग्रा.प. अ. न.

उद्घाटक देवलालजी ठेंगरे माजी अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी , उपाध्यक्ष नानाजी बगमारे माझी पोलीस पाटील,चांदेकर सर शिक्षक (विकास विद्यालय अ. न.), विशेष अतिथी वंदनाताई मेश्राम आशा कामगार, गोवर्धन बागडे , बाळकृष्ण जराते, रघुनाथ चंडीकार, मंगेश जराते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या