Advertisement

उपमुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करायला आले असता अतुल देशकर यांनी विविध

उपमुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करायला आले असता अतुल देशकर यांनी विविध

मागील अनेक दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यासह परिसरात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करायला आले असता त्यांची अतुल देशकर यांनी भेट घेतली व ब्रह्मपुरी तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा दिला.

या वेळी आपादग्रस्तांना तात्काळ मदत करावी, शेतजमिनीचे व पडलेल्या घरांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, आपादग्रस्तांना लवकरात लवकर योग्य तो मोबदला सरसकट देण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी, ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा व गांगलवाडी गावाजवळील नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करावे, ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या लाडज रणमोचन व खरकाडा गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी. या सर्व समस्या पुर्ण करण्या बाबत मागणी करत उपमुख्यमंत्री यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व यावर कार्यवाही करू असा सकारात्मक विश्वास मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी याप्रसंगी दिला.

यावेळी संजय गजपुरे, मनोज भूपाल, अरविंद नंदुरकर, साकेत भानारकर, तनय देशकर व नितीन बोदेले उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या