२६ जनवरी ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूंन लोकांना व प्रशासनाला कडू द्या 26 जनवरी व 15 ऑगस्ट मधला फरक “सत्य शोधक संघ कन्हान” तर्फे
निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब सिविल लाइन्स,नागपूर यांना देण्यात आले.
इ.स.1947 साली जरी भारत देश इंग्रजा पासून स्वतंत्र झाला, तरी पण आपल्याला हक्क,
अधिकार,व संपूर्ण स्वातंत्र दिनांक 26जानेवारी 1950 ला भारतीय जनतेला प्रजासत्ताक गणतंत्र च्या रूपात मिळाले. ते मिळू शकले भारतीय संविधानामुळे.
जे संविधान भारतात लागू झाले त्यात समता, बंधुत्व, न्याय या मुख्य पायाभूत अधिकारासह.
आणि हे सर्वश्रेष्ठ संविधान लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी.
दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवस जे बाबासाहेबांनी परिश्रम घेतला. त्याचे फल स्वरूप हा देश इतक्या प्रगतीपथाचा उंच शिखर गाठले आहे. साहेब आज शोकांतिका आहे की आजही शासकीय कार्यालय व निमशासकीय कार्यालय तसेच शाळा महाविद्यालयात 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला फक्त महात्मा गांधी भगतसिंग चंद्रशेखर आजाद सुभाष चंद्र बोस या महान क्रांतिकारी व हुतात्मा च्या चित्र/फोटो लावले जातात व तसेच या दोन्ही दिवशी 26 जनवरी व 15 ऑगस्टला स्वतंत्र आजादी चे गाणे लावले जातात किंतु 26 जानेवारीला भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे हे गाणे लावण्यात यावे व 26 जानेवारीला फक्त संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र,फोटो लावण्यात यावे आणि लोकांना प्रशासनाला या दिवसाच्या खरं महत्त्व कडवून द्यावा. प्रशासनातील अधिकारीना आपण आदेश देण्यात यावा की प्रजासत्तक दिन/ गणतंत्र दिन या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूनच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करू सकाल.
करिता आपल्याला सत्यशोधक संघ, कन्हान द्वारे आपल्याला हा निवेदन देण्यात येत आहे.
करिता आपण ह्या विनंती निवेदनाला आपण योग्य निर्णय घेऊन लोकांना व प्रशासनाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जनवरी प्रजासत्ताक/ गणतंत्र दिन चा अंतर कडू द्यावा असे निवेदन
जिल्हाधिकारी,नागपूर व तहसीलदार पारशिवनी यांना सत्य-शोधक संघ कन्हान तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन कर्ते:-
सतीश भसारकर
नंदकिशोर वंजारी
प्रतिनिधी:- भारत पगारे


0 टिप्पण्या