उदापूर ग्रामपंचायत प्रशासनला दोन वर्षानंतर आली जाग:ग्रामपंचायत उदापूर यांच्या चुकीच्या नियोजनामुळे पाण्यासाठी हाहाकार
ब्रम्हपुरी तालुक्यातील: उदापूर हे गाव तीन हजार लोकसंख्येचे गाव असून गावात पाण्यासाठी नेहमी उन्हाळ्यात पायपीट महिलांना करावी लागते दोन सौर उर्जेवर चालणारे पाणीपुरवठा सोत्र आहेत, २५ हातपंप असून नळाची पाणीपुरवठा योजना घराघरात पोहोचली पण पाणी पोहोचले नाही.
भर उन्हाळ्यात वेळेवर पाणीटंचाई नेहमी भासत असते हे नेहमी ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय युवा पॅंथर संघटनेचे तालुका अध्यक्ष निवेदना मार्फत दोन वर्षापूर्वी दिले होते. आणि गावकरी महिला एकत्रित होऊन सोबत घागर मोर्चा काढला होता. आखिर दोन वर्षानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला नांगी टाकून सौर उर्जेवर चालणारी ही नळयोजना चालू करावी लागली मार्च २०२१ पासून पूर्णपणे बंद असलेली सौर उर्जेवर चालणारे नळयोजना हे सुरळीत चालू झाली याचे भारतीय युवा पॅंथर संघटनेचे अध्यक्ष तथा गावातील नागरिकाचं कौतुक केले जात आहे.
राहुल भोयर


0 टिप्पण्या